भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे पहाटे एका युवकास बिबट्याने केले गंभीर जखमी
अतिवृष्टीच्या नुकसनीपोटी जिल्ह्याला २२१ कोटी मंजूर३३ मंडळातील ८१ हजार शेतकऱ्यांना दिलासावगळलेल्या मंडळासाठी पाठपुरावा करणारआमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
धाराशिव, : प्रतिनिधी
जिल्ह्यातील ५७ पैकी ३३ महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. ज्याठिकाणी अतिवृष्टीची नोंद नाही तेथेही नदी-नाले आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी जिल्ह्यातील ८१ हजार शेतकऱ्यांना राज्यसरकारने २२१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. निवडणूक कालावधीत आचारसंहिता असताना निवडणूक आयोगाच्या अनुमतीने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यात यावी यासाठी ना.देवेंद्र फडणवीस साहेब,एकनाथ शिंदे साहेब व अजित दादा पवार यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.सततचा पाऊस आणि अतिवृष्टीसाठी राज्य आणि केंद्राच्या आपत्ती निवारण निधीचे निकष ठरलेले आहेत. मात्र अतिवृष्टी आणि सततचा पाऊस नसतानाही, ज्या ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे, तिथे तलाठ्यांमार्फत नुकसानीचे पंचनामे करून तसा स्वयंस्पष्ट अहवाल घेण्याच्या सूचना तहसीलदार तथा कृषी अधिकार्यांना आपण दिल्या होत्या. पाडोळी शिवारात साधारणपणे दोन हजार 500 हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी नदीकाठी पुरामुळे 350 हेक्टरहून अधिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. अतिवृष्टीमुळे जिथे नुकसान झाले त्या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना ज्या पद्धतीने मदत केली जाते अगदी त्याप्रमाणेच पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांनाही राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची मदत मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या एक लाख ६३ हजार ९७ हेक्टर क्षेत्रावरील ८० हजार ७८६ शेतकरी बांधवांच्या नुकसनीपोटी २२१ कोटी ८१ लाख ३० हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असतानाही निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करायला हवी यासाठी आपण मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिवांकडे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता त्याला आता यश आले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.वगळलेल्या महसूल मंडळासाठी पाठपुरावा करणार जिल्ह्यातील ५७ पैकी ३३ महसूल मंडळात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे नुकसान झाले असल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद असल्याची बाब आपण स्वतः प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांना १८ ऑक्टोबर रोजी पत्र लिहून निदर्शनास आणून दिली होती. जिल्ह्यातील अन्य महसूल मंडळातील वस्तुस्थितीही त्याचवेळी त्यांच्या ध्यानात आणून दिली. धाराशिव, भूम, परंडा आणि तुळजापूर तालुक्यातील २४ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद नाही. मात्र झालेले नुकसान मोठे आहे. अनेक ठिकाणी सदोष पर्जन्यमापकांमुळे अतिवृष्टी असतानाही ती नोंदविली गेलेली नाही. त्यामुळे २०२२ साली ओढवलेल्या आपत्तीवेळी नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल ज्याप्रमाणे शासनाकडे सादर करण्यात आला होता, अगदी तीच प्रक्रिया अनुसरून नुकसानीची व्याप्ती लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार उर्वरित २४ महसूल मंडळात दोन वर्षापूर्वी ज्याप्रमाणे वस्तुनिष्ठ नुकसानीच्या निकषानुसार केलेल्या पाहणीचा अहवाल ग्राह्य धरावा व त्यांनाही तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली होती.स्वयंचलित हवामान केंद्रात २४ तासात ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास आणि शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान असल्यास अनुदान स्वरूपात शेतकर्यांना मदत दिली जाते. मात्र अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टी नसतानाही शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही गावांत सलग पाऊस पडल्यामुळे सोयाबीनला मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने सततचा पाऊस आपत्ती म्हणून घोषित केला आहे. पीक काढणीच्या काळात सोयाबीनला बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाला. शेंगातील दान्याची प्रत खराब झाल्याने तेथील शेतकर्यांनाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे ज्या महसूल मंडळांना या नुकसान भरपाईतून वगळले आहे त्यांना जोवर मदत मिळत नाही तोवर आपण पाठपुरावा करणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

तुळजापूरनामा न्युज चॅनलला लाईक👍🏻आणि सबस्क्राईब🔔करा
ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर
📞 888844884