तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथील;अडीच वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथील;अडीच वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथील एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा शेतातील घरासमोर जनावरांच्या पाण्यासाठी बांधलेल्या हौदात समर्थ चव्हाण बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि.२९ सकाळी दहा वाजता घडली.

तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथील शेतकरी बालाजी चव्हाण यांनी जनावरांना पाणी पिण्यासाठी पाण्याचा हौद बांधला होता. अडीच वर्षांचा मुलगा समर्थ घरासमोर खेळत होता.घरी कुणी नव्हते. यावेळी समर्थ पाण्याच्या हौदात जाऊन पडल्याने त्याच्या नाका-तोंडात पाणी गेले. अर्ध्या तासाने बालाजी चव्हाण यांची पत्नी घराकडे आली. घरासमोर खेळणारा मुलगा दिसत नसल्याने त्यांनी सगळीकडे शोध घेतला. पाण्याच्या हौदात डोकावून पाहिले असता समर्थ हौदात दिसून आला.यावेळी भेदरलेल्या आईने आरडाओरडा करत तातडीने समर्थला पाण्याच्या बाहेर काढून उपचारासाठी तुळजापूरला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टर नसल्याने उपजिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करून समर्थला मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!