तुळजापूर तालुक्यातील १०८ गावच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

तुळजापूर तालुक्यातील १०८ गावच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील १०८ गावच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत बुधवार दि. १६ एप्रिल २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालय तुळजापूर यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच उपसरपंच ) निवडणुक नियम १९६४ मधील नियम २ अ च्या पोटनियम (१) व(२) आणी याविषयी ग्रामविकास विभाग मुंबई यांचेकडील शासन अधिसुचना असाधारण क्रं ८७ दि ५ मार्च २०२५ नुसार धाराशिव जिल्ह्यातील (६२१) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या संदर्भीय दि.८ एप्रिल २०२५ च्या आदेशानुसार सन २०२५ – २०३० या कालावधीसाठी तालुकास्तरावर सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

त्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायती मधील सरपंच पदे सन २०२५ ते २०३० या कालावधीत करीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, व सर्वसाधारण व या प्रवर्गातील महीला आरक्षण काढणेची प्रक्रिया दि १६ एप्रिल २०२५ वार बुधवार रोजी सकाळी ठीक ११ वाजता स्पोर्ट्स हाॅल श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय नळदुर्ग रोड येथे जिल्हाधिकारी धाराशिव यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी , उपजिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

तुळजापूर तालुक्यातील १०८ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत बुधवारी होणार असल्याने आरक्षण सोडतीची उत्सुकता लागली आहे.काही ग्रामपंचायती वगळल्या तर मागील पंचवार्षिक निवडणुकीत सदस्यांमधुन सरपंच निवड प्रक्रिया करण्यात आली होती . परंतु आता राज्यात भाजपा महायुतीचे सरकार आल्याने सरपंच थेट जनतेतुन निवडला जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसारच सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत झाल्यांनंतर पुढील तयारीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात होणार असल्याची चर्चा नागरीकांमधुन होत आहे. तत्पूर्वी बुधवारी होणाऱ्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!