श्री.तुळजाभवानी देविच्या मंदीराचेकामकरताना दर्शन, पुजा,विधी अबाधित राहणार –
आ राणाजगजीतसिंह पाटील
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी देविच्या मंदीराचे जीर्णोद्धाराचे काम करीत असताना मंदीर बंद राहणार असल्याची संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.अशी काही परिस्थिती राहणार नाही.मुळ मंदिराचे काम करीत असताना देवीचे दर्शन आणि दैनंदिन विधी त्याच्या मध्ये कुठीलीही बाधा होणार नाही, अशा प्रकारचा मार्ग काढण्यात आला असल्याची माहिती आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली.
दरम्यान तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात दि.८ मार्च रोजी आयोजित पत्रकार परीषेदे मध्ये ते बोलत होते.यावेळी माजी नगरसेवक विनोद गंगणे,माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, नागेश नाईक,आनंद कंदले,शांताराम पेंदे यांच्यासह आदी उपस्थित होते.
तसेच पुढे बोलताना आ.पाटील शिखराच्या बाबत बोलताना म्हणाले, संभाजीराजे ची इच्छा नुसार एएसआय चे मत पुढील पंधरा दिवसात घेऊन अंतिम निर्णय घेऊ असे मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.मंदिरासमोरील मंडपाचे बरेचशे खांब तिरके, तर काही ठिकाणी क्रॅक झालेले आहेत. तो मंडप पूर्णपणे उतरवून पुन्हा उभा करण्याच काम टप्याटप्याने केल जात आहे.मंदिरा चे काम धर्म शास्त्राच्या अनुषंगाने करण्यासाठी दक्षिण भारतातील सगळे मंदीर ज्या पिठाशी संलग्नीत आहेत, त्या
श्रींगिरी मठ शारदा पीठाचे जगत गुरु शंकराचार्य यांचे मार्गदर्शन घेण्याच ठरले आहे. तेथील मुख्य पुजाऱ्यांनी तुळजापूर येथे येऊन पुर्ण मंदिराची पाहणी केली आहे.त्यांना नकाशे दिले ते सगळे नकाशे घेऊन महास्वामीजी सोबत प्रत्यक्ष चर्चा ही झाली आहे.महास्वामीजी स्वतः पुर्ण अभ्यास करून धर्मशास्त्रातील दाखले देऊन पुढच्या काही दिवसात लेखी अहवाल देणार आहेत. जेणेकरून मंदिराचे काम धर्माच्या अनुषंगाने योग्य पद्धतीने करु याबाबतीचा योग्य अहवाल आल्यानंतर पुढच्या गोष्टी ठरणार आहे.सध्या ज्या ठिकाणी क्रॅक आहेत त्याठिकाणी लेखी स्वरूपात स्ट्रकचलर इंजिनिअरकडून स्ट्रकचलर ऑडिट करून योग्य पद्धतीने टेकण देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. मुळ मंदिराचे काम करीत असताना ६ महिने तयारी ला लागणार आहेत.मंदीराचे काम नवरात्री आणि पौर्णिमे च्या नंतर नेहमी च्या महत्वाच्या विधी झाल्यानंतर काम हाती घेणार आहोत.तोपर्यंत तयारी सगळी करणार आहोत.
त्याच बरोबर इतर जी कामे आहेत, ती कामे चालू ठेवून पूर्ण करणार आहोत. जेवढे शक्य आहेत, ते बाकीचे कामे पुर्ण करून घेणार आहोत. एकदा मंदीराचे काम चालू केले की काम सहा महिन्यात पूर्ण व्हावे असे नियोजन केले आहे. कमीत कमी वेळेत काम योग्य पद्धतीने कसे होईल याकडे लक्ष देणार आहोत.तांत्रिक दृष्ट्या शिखर जेवढे सोन्याचे करता येईल तेवढं करण्याच नियोजन राहील. हे सर्व करीत असताना भाविक केंद्रस्थानी राहणार आहेत. भावीक आणि देविचे दर्शनाला प्राधन्य राहणार आहे. त्याचबरोबर पुजारी, व्यापारी इतर नागरीक यांच म्हणणं ते अंतर्भुत करीत आहोत.मंदीराचे काम चालू असताना देविचे दर्शन आणि विधी मध्ये बाधा येणार नाही अशा अनुषंगाने नियोजन केल जाईल.