तिर्थक्षेञी कायदा सुव्यवस्थाता निर्माण करण्याचे पोलिस निरक्षक आण्णासाहेबांना आव्हान !
एम डी ड्रग्ज,अवैध धंदे चोऱ्या रोखुन नागरिकांचा विश्वास निर्माण करणार का – श्रीकृष्ण सुर्यवंशी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तिर्थ क्षेत्र धार्मिक स्थळ असलेले साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पुर्ण शक्तीपीठ म्हणून देशभर प्रसिद्ध असून तिर्थक्षेञ तुळजापूर हे अवैध धंद्यामुळे बदनाम झाले आहे. नुतन पोलिस निरक्षक आण्णासाहेब मांजरे यांना या धार्मिक क्षेत्राठीकाणी शांतता कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचे आव्हान असणार आहे.
स्ञीशक्ती देवता असलेल्या श्रीतुळजाभवानी नगरीचा सर्वाधिक ञास हा महिला वर्गास सहन करावा लागत आहे म्हणून तर त्यांनी थेट ड्रग्ज प्रकरणी आ राणाजगजितसिंह पाटील यांना माहीती दिल्याने ड्रग्ज रँकेट समोर आले.
अवैध धंदे विरोधात शहारवासियांना ऐकवटावे लागले या काळात तक्रारदारांना थेट कारवाईच्या धमक्या पोलिस अधिका-यांन कडुन दिल्या गेल्याने पोलिस बाबतीत जनक्षोभ वाढत गेला श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ देशभरातुन चोवीस तास कोट्यावधी भावीक दर्शनार्थ येत असल्याने येथे कायमच गर्दी असते परंतु मागील काही वर्षापासुन तुळजापूरातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे शहर पोलीसांच्या नाकर्तेपणामुळे निघाले असुन शहर परीसरात घरफोडी, जबरी चोरी, चेन स्नॅचींग, मोटार सायकल मोबाईल चोऱ्या ड्रग्ज चक्र्या शहर बाहेर चालणारे मोठमोठे जुगार अड्डे मटका आँनलाई शेतकऱ्यांच्या मोटार वायर चोऱ्या फसवणूक या सारख्या अवैध धंदेत प्रचंड वाढ झाली आहे सतत हमखास शहरात दररोज घरफोडी व जबरी दरोडे पडन्याच्या घटना नित्यनेमाने घडु लागल्या आहेत त्यामुळे शहरवासी भयभीत असुन चोरांच्या भितीपोटी नागरीक रात्रभर न झोपता घराची सुरक्षा करण्यासाठी जागता पहारा देत आहेत परंतु पोलीस प्रशासन मात्र नुसते चोरीचे एफआयआर नोंदवुन कागद काळे करुन कारवाईचे नुसते सोंग करुन नागरीकांच्या तोंडाला पाने पुसण्याच काम करत आहेत, शहरातील अपसींगा रोड व नळदुर्ग रोडलगत वस्ती विरळ असल्याने सगळ्यात जास्त चोर्या या भागात होत हे चोर चक्क आता शहरात घुसले असुन यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे.नागरिक शांतपणे रात्रभर झोपुच शकत नाही अशी अवस्था या भागात झाली असुन गत सहा महीन्यात शेकडो चोर्या-घरफोड्या या भागात झाल्या असून आतापर्यंत एकाही चोरीचा छडा पोलीसांनी लावल्याचे ऐकन्यात नसल्याची खंत नागरीक उघडपणे बोलुन दाखवत आहेत परंतु प्रश्न असा आहे की शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी घरफोडी दरोडे होऊनसुद्धा पोलीसांना आरोपी सापडत नाहीत हे वास्तव नाकारता येणार नाही.
सदर प्रकरणात एक गोष्ट मात्र लक्षात येते की चोरांना आता तुळजापूर पोलीसांचे भयच उरले नसुन चोरं रोजचं ठरल्याप्रमाणे चोरी घरफोडी जबरी दरोडे घालत असुन आता तुळजापूर शहर वास्तव्यासाठी धोकादायक बनल्याचे चित्र निर्माण झाले असुन नागरीक मात्र त्रस्त होऊन गेले असुन नागरीकांचा पोलीसांवरचा विश्वास उडाल्याचे चित्र तुळजापूर शहरात दिसत आहे एकंदरच नुतन पोलिस निरक्षक यांनी शहर आता याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जबर कारवाई करणे अपेक्षित असुन पोलीस काय कारवाई करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे….