प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तलाठी कार्यालय धुळखात शासनाचा कोट्यावधी खर्च वायफळ; तलाठी कार्यालयाच्या इमारतीमध्ये वऱ्हाह पालन – शिवसेना नेते अमोल जाधव

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तलाठी कार्यालय धुळखात

प्रशासनाचा कोट्यावधी खर्च पाण्यात; तलाठी कार्यालयाच्या इमारतीमध्ये वऱ्हाह पालन – अमोल जाधव

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळ

महसूल प्रशासन आणि शेतकरी यांच्यामधील महत्त्वपूर्ण दुवा मानल्या जाणाऱ्या तलाठ्यांना त्यांच्या कर्तव्यावरील गावातच अगदी चोखपणे कर्तव्य बजावता यावे व यातून नागरिकांना आपापल्या गावातच तलाठ्याकडील कामे करून घेता यावीत म्हणून तात्कालीन सरकारने प्रत्येक महसुली साज्याला सुसज्ज असे एक तलाठी कार्यालय बांधून देण्याचे ठरविले होते तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सह तुळजापूर शहरातसुद्धा तलाठी कार्यालय ही पूर्णपणे कार्यालयीन कामकाजासाठी सुसज्ज झाली असून प्रशासनाच्या ढिसाळ व उदासीन धोरणामुळे मोठ्या प्रमाणात निधी खर्ची घालून बांधलेली तलाठी कार्यालय अद्यापही धुळखात पडली असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत असून यातून संबंधित गावावर कर्तव्य बजाविणाऱ्या तलाठ्यांना व तलाठ्याकडे कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे सुसज्ज असे तलाठी कार्यालय रंगरंगोटीसह पूर्णत्वास जाऊनही महसूल प्रशासन या इमारती आपल्या ताब्यात का घेत नाही याबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला असल्याचे दिसत

शिवसेना नेते अतोल शिवाजीराव जाधव यांची प्रतिक्रिया

तुळजापूर तालुक्यातील सज्जा ठीकाणी शासनाने कोठ्यावधी रुपये खर्च करून तलाठी कार्यालयाच्या इमारत बांधकाम केले आहे मात्र महसूल शासनाच्या ढिसळ कारभारामुळे तलाठीकार्यालयाच्या इमारत धुळकात पडले आहेत.तुळजापूर शहरासाठी असलेले तलाठी कार्यालयाच्या इमारतीमध्ये सध्या वऱ्हाह पालन केल्याचे निदर्शनास येत आहे.अन दुसरीकडे भाडेच्या इमारतीमध्ये तलाठ्याने दुकान थाटले आहे.

शिवसेना नेते
अमोल शिवाजीराव जाधव, तुळजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!