तुळजापूर पोलिसांची मोठी कामगिरी;चोरी,गहाळ झालेले दोन मोबाईल नागरिकांना केले परत

तुळजापूर पोलिसांची मोठी कामगिरी;चोरी,गहाळ झालेले दोन मोबाईल नागरिकांना केले परत

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर शहरातील हरविलेले तसेच गहाळ झालेले मोबाईल परत मिळण्याची शाश्वती कमी असताना तुळजापूर पोलिसांनी तब्बल तीन वर्षानंतर शहीद फौजी विजय दरेकर यांचा तीन वर्षाखाली हयात असताना गहाळ झालेला मोबाईल त्यांच्या मुलगा अर्जून विजय दरेकर यास परत केला तर दुसरा मोबाईल सौ. वर्षा ज्ञानेश्वर जाधव रा. वेताळ नगर यांचा मोबाईल तीन महिन्याखाली हरवलेला मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांनी यश मिळविले आहे.

संबंधित नागरिकांना हे मोबाईल पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या हस्ते परत करण्यात आले. यावेळी पोलिस संतोष करवार, पोलिस मारुती माळी आदि उपस्थित होते.त्यावेळी संतोष पाटील यांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!