“मतदान चोर,खुर्ची सोड”च्या घोषणांदेत सरकारच्या विरोधात तुळजापूर शहर महारॅली
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
भाजपाने मतचोरी करुन सरकार आणल्याचा दावा करत मतदान चोर,खुर्ची सोड अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी,कार्यकर्त्यांनी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच भवानी रोड,आर्या चौक, कमान वेस शहरात महारॅली काढून सरकारच्या विरोधात गुरुवार दि.२१ ऑगस्ट रोजी घोषणाबाजी करीत महारॅली काढण्यात आली.
मतदानाचा अधिकार एका गरीब व्यक्तीपासून श्रीमंत व्यक्तींना एकसारखाच समान आहे. मात्र, तो अधिकार आज चोरला जात आहे. त्यामुळे लोकशाहीस तडे बसत असून, लोकशाही टिकविण्यासाठी जनतेनेच आवाज उठविले पाहिजे. त्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने मतदान चोरांच्या विरोधात तुळजापूर शहरात महारॅली काढण्यात आली आहे.
या महा रॅलीमध्ये लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतदान चोरी या विषयी निवडणूक आयोगाला जो प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकले नाही म्हणून जनजागृतीसाठी महाविकास आघाडीयांच्या वतीने घोषणादेत रॅली करण्यात आली रॅली संपल्यानंतर उमरगा मतदार संघाचे आमदार स्वामी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामदादा अलुरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील ,अमर चोपदार, तोफिक शेख ,विवेक शिंदे, जनसेवक अमोल कुतवळ, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अर्जुन साळुंके, भरत जाधव ,कालिदास नाईकवाडी ,नवनाथ जगताप, उत्तम अमृतराव ,किरण खपले यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आदि उपस्थित होते.