तुळजापूर तालुक्यातील तलाठ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करा – शिवसेना नेते अमोल जाधव

ततुळजापूर तालुक्यातील तलाठ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करा – शिवसेना नेते अमोल जाधव

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तालुक्यातील तलाठ्यांच्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे नेते अमोल शिवाजी जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केले आहे.

तुळजापूर तालुक्यात अतुल खंडाळकर हे कनगरा येथे तलाठी या पदावर कायमस्वरूपी नेमणूक असताना त्यांना तुळजापूर तालुक्यात Depotation प्रतिनियुक्ती ही तहसिल कार्यालय, तुळजापूर येथे केलेली आहे. तरी तुळजापूर तालुक्यातला तलाठी कार्यालयाला तलाठी असून तुळजापूरमध्ये .एस.जी.स्वामी, महसूल सहाय्यक तुळजापूर येथे बदली असून त्यांना कळंब येथे प्रतिनियुक्ती केलेली आहे, तसेच ए.जी. बांगर यांची तुळजापूर येथे बदली असताना त्यांना वाशी तहसिल कार्यालय येथे प्रतिनियुक्ती दिलेली आहे.कोणाच्या आश्रयाखाली देण्यात आली आहे, त्याचा मास्टरमाईंड कोण आहे याची ही तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल असा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.तरी जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून प्रतिनियुक्त्या ह्य तात्काळ रद्द करण्याचे आदेश दयावेत अशी ही या निवेदनातून मागणी केली आहे या निवेदनावर अमोल जाधव यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!